ज्याची कालांतराने झीज होत राहते ते म्हणजे शरीर. जगामध्ये कुठलीही गोष्ट असो मग ती सजीव असेल किंवा निर्जीव ह्याची निसर्गनियमाप्रमाणे कालांतराने झीज होतेच.

आपण आता म्हातारे झालो असे स्वत:च आपण समजू लागलो तर शरीरातसुद्धा त्­याप्रमाणे क्रिया घडू लागतात. वृद्ध लोकांचा आत्मविश्वास सर्वच बाबतीत कमी व्हायला लागलेला दिसतो. त्­यातच आजार झाले म्हणजे तर ते हतबलच होतात. त्­यांच्­यावर एक प्रकारचे मानसिक दडपण येण्यास सुरुवात होते आणि ह्याच सततच्­या दडपणामुळे शरीरसुद्धा आजाराशी दोन हात करू देत नाही आणि त्याची तीव्रता त्­या व­यात जास्त जाणवू लागते.

म्हातारपण म्हणजे दुसर्‍यांदा बालपण जगणे. आपले वय जसजसं वाढत जाईल तसतसं आपला विचार करण्याचा दर्जा ही वाढतच गेला पाहिजे.

जिंदगी बडी होनी चाहिए – लंबी नही. समाजात राहणारा प्रत्­येक नागरिक हा कालांतराने वृध्द होणारच असतो. एखाद्या माणसाला त्­याचे व­य विचारले की आपल्­या जन्मतारखेप्रमाणे आपले वय किती आहे ते सांगतो यालाच कालक्रमाला धरून सांगितलेले वय असे म्हणता ­येईल. व्­यवहारामध्ये असे व­य सांगणे योग्­य असले तरी आपले शारीरिक, मानसिक व सामाजिक वय किती आहे ह्याच्­ा प्रत्येक व्­यक्तीने विचार केला पाहिजे. एखादा ५० वर्षांचा माणूस २५-३० वर्षाचा माणसाएवढा दिसतो किंवा अगदी तिशीतला माणूस ५० वर्षाचा माणसाएवढा दिसू लागतो. शरीरातील अवयवांवर आणि पेशींवर कालमानाप्रमाणे झालेला परिणाम ह्याला जैविक व­य किंवा Biological Age असे म्हणतात.

थोडक्यात काय तर शारीरिक किंवा जैविक वय प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलणारे असते. नियमीत व्यायाम, चौकस व पौष्टिक आहार आणि आदर्श जीवनपद्धती जर आचरणात आणली तर म्हातारपणीसुद्धा बरेचसे वृद्ध फिट राहू शकतात. शारीरिक वयाप्रमाणे मानसिक वयही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळे असते. काही मानसिक कारणांमुळे जसे नैराश्य, एकाकीपणा, सतत मानसिक दडपण, आर्थिक विवंचना, कर्जबाजारी होणे, अतिमहत्त्वाकांक्षा किंवा चिडचिडेपणा, निरुद्योगी माणसांमध्ये जास्त काळ राहणे ह्यामुळे एजींग प्रोसेस लवकर होत जाते त्यामुळे मानसिक शांती फार महत्त्वाची आहे.

शरीराची झीज किंवा विनाश होऊ द्यायचा नसेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे शरीराचा सतत वापर करीत राहणे. आपल्या शरीरात जी काही ऊर्जा किंवा शक्ती असते ती काम करत राहिल्यामुळेच टिकून राहते.

वयोमानानुसार शरीरामध्ये खालीलप्रमाणे काही विशिष्ट बदल दिसून येतात.

) शरीरातील चरबी : शरीरातील चरबीचे प्रमाण वयाच्या २० ते ६०व्या वर्षापर्यंत खूप जास्त असते व नंतर ते हळूहळू कमी होऊ लागते.

) चयापचय (मेटाबॉलीझम) : वयाच्या पन्नाशीनंतर चयापचय क्रियेचा वेग मंदावू लागतो. जितका आहार आपण पूर्वी घेतो त्यापेक्षा आहाराचे प्रमाण कितीतरी पटीने कमी होते.

) रक्तदाब : वय जसजसं वाढत जाते तसतसं रक्तवाहिनीची प्रसरण पावण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्याची लवचिकता कमी होते व ते संकुचित होतात व त्यामुळे रक्ताचा दाब वाढतो.

) ब्लडशुगर : प्रत्येक व्यक्तीला शरीरातील विशिष्ट ऊर्जा टिकवण्यासाठी साखरेची गरज असते. रक्तातील साखर आवश्यकतेप्रमाणे शरीरातील सर्व भागात पोहचवली जाते परंतु जसे जसे वय वाढते तशीतशी शरीरातील रक्ताची साखर वापरून घेण्याची क्षमता कमी व्हायला लागते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. शरीरातील स्वादुपिंडाची कार्यशक्ती कमी होते व मधुमेहाची शक्यता निर्माण होते.

) सांध्याचे दुखणे : वय झालं की सांधेदुखी होणारच, अशी आपण आपल्या मनाची तयारी करतो. परंतु तरुणपणात काळजी घेतल्यास उतारवयात हा रोग आपल्याला त्रास देऊ शकत नाही. कारण हल्ली उपलब्ध असणार्‍या आधुनिक औषधोपचारामुळे हा आजार अगदी सहजपणे नियंत्रणात आणता येतो. संधिवाताचा जर विचार केला तर पुरुषांच्या  तुलनेत स्त्रियांमध्ये संधिवाताचे प्रमाण अधिक आढळून येतं. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास भविष्यात स्त्रियांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते.

ज्येष्ठांसाठी काही महत्त्वाच्या टीप :

१) दिवसा शक्यतो झोपू नये. परंतु रात्री मात्र कमीत कमी ७ ते ८ तास झोप घ्यावी.

२) दिवसातून थोडे थोडे तीन चार वेळा मोजकेच खावे.

३) रात्रीचे जेवण शक्यतो हलके घ्यावे.

४) वजनावर नियंत्रण ठेवावे.

५) नियमितपणे जमेल तेवढा व्यायाम करणे जसे चालणे, सायकलींग, बागकाम व काही घरची कामे इ.

६) तंबाखू, धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे.

७) थंड पदार्थ शक्यतो टाळावेत.

८) औषधे घेण्याची जरूरी असेल तरच ती घ्यावीत आणि ती सुद्धा वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी. स्वत:च्या मनाने सेवन करू नयेत.

९) वार्धक्यामध्ये वात दोषाचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे वातुळ पदार्थ किंवा कडधान्याचा वापर जास्त करू नये.

१०) रोज किमान १ ग्लासभर दूध तरी प्यावे.

साधी साधी तत्त्वे जर आचरणात आणली तर आयुष्यमानाचा नाही तर जीवनमानाचा दर्जासुद्धा सुधारतो.

समर्थ रामदाससुद्धा म्हणतात,

ओषध न घे व्यथा पथ्य न पाळे सर्वथा

न मिळे आली या व्यधा तोचि एक मूर्ख